Sufi: कातरवेळ
कातरवेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कातरवेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...
टेबलावर कसलाच केओस नव्हता. फक्त एक पेन, डायरी आणि काॅफी....
शेवटची ओळ टाइप करुन फिनिशिंग लाईनलाच होते, तितक्यात काॅफीच्या बुडबुड्यांनी मला खुणावल्यासारखं वाटलं... आपलं मन प्रत्येक गोष्टीत नवखं शोधत असलं की, हे भास खरे वाटतात. मलाही मॅजिकसारखं खरं वाटलं. त्यानंतर खरी मजा आली.
वि हॅड डेट. आम्ही डेटवर गेलो..
ऑफकोर्स आय & कॉफी...
इट वॉज इन्नोवेटिव्ह ... येस .. ट्रस्ट मी इट वॉज इन्नोवेटिव्ह .. ! त्या बुडबुड्यांतील कॉफीच्या धुराळ्यातून वाट काढत काढत मी इतकी दूर गेले की त्यातून मागे येणं कठीण होऊन बसलं.
काॅफीने अचानक प्रश्न केला.
"तुझ्यासाठी कॉफी काय आहे? लोकांसाठी दोन चमचे साखर, दूध, कॉफीसॅशे मग त्यात गोडव्यासाठी रोमॅंटिक तो आणि ती. हे मिश्रण म्हणजे काॅफी? यापलिकडे जावून मी वेगळी कोणीच नाही का ..? तुला काय वाटतं..?"
"..उम्म्मम ....कॉफी...कॉफी... कॉफी... अगदी खरं सांगू ? याआधी नाही केला गं मी पण हा विचार म्हणजे बघ हां सहज लिहायचं झालं तुझ्यावर, तर काॅफी एक असं वर्तुळ आहे जिला कुठल्याही सीमा नाहीत,परिघ नाही आणि कोणत्याही अर्धवट त्रिज्येचा आधार नाही. एका शब्दात सांगू तर स्वतःच्या सौंदर्याने नटलेली ती एक इंन्स्पिरेशनल स्त्री आहे ... ते पूर्ण वर्तुळ तुझं तु एकटीने व्यापलंय. होय! स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन म्हणजे तु आहेस .."
"वाॅव .... जस्ट वाॅव... याहून खास मी असूच शकत नाही. किती सुंदर बनवलंय तु मला ....पण माझ्या व्याख्येने तु कधी इंन्स्पायर झालीयेस का गं?"
त्यावर आइ वाॅज लाइक "व्हाॅट.?" माझ्या चेहऱ्यावर स्थिर भाव दिसल्यावर तीनेच कन्टिन्यू केलं...
"म्हणजे जसं मी म्हणजे स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन...तसं तु कोण आहेस ...?. तुझं स्वातंत्र्य, तुझं पॅशन काय आहे...?"
तिच्या त्या प्रश्नावर माझं अनुत्तरित राहणं सहाजिक आणि तिला अपेक्षित असावं....
"वेल ग्रांन्ट मी टू टेक युवर लिव." ती घाईत होती किंवा कदाचित तिला जे सांगायचं होतं ते सांगून झाले होते त्यामुळे ती निघाली आणि त्यामुळेच मीही थांबवलं नाही तिला..
जाता जाता ती म्हणाली,
"एक लक्षात ठेव तुझ्या आजूबाजुलाच तु स्वत: सापडशील. माझी व्याख्या बनताना बघायचंय मला तुला. शोध "..एवढं बोलून ती लुप्त झाली....
पण तिच्या त्या एका प्रश्नाने वादळ केलं... आयुष्यात योग्य मार्गदर्शक हवा असतो, तो मला योग्य वेळी मिळाला...खूप विचार नाही करावा लागला मला, कारण खर्रच माझी व्याख्या माझ्या भोवतालीच होती....
मला माझी कॉफी सापडली "माझं लिखाण."
खरं सांगायचं तर, मच्युर्डपणाच्या व्याख्येत मी कुठेच बसत नाही. नात्यांबद्दलचा चाललेला बाजार मला जमत नाही. दुनियेची पारख, माणसं ओळखता येणं यापैकी मला काहीच जमत नाही म्हणजे मला माणसांमध्ये राजकारण करता येत नाही त्यामुळे असे बक्कळ भरमसाठ अनुभव नाहीत. ही गर्वाने मिरवण्याची गोष्ट नाही, याला आताच्या भाषेत हुशार लोक बावळटही म्हणतील.
पण हरकत नाही जसं त्यांच्यासाठी मी बावळट, तसं माझ्यासाठी ते ...? छानच.
असो.. !
पण आतापर्यंत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आणि आवडत आली ती म्हणजे,
'जो मजा स्ट्रगल में है ना बॉस, वो दुनिया के किसी कोने में नहीं ...'
सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नवी होती मी लिखाणाच्याबाबतीत, तशी आजही आहे. पण आता लोकांना माझं लिखाण किमान कळेल इथवर तरी पोहोचले आहे.
काल एकाने सुचवलं,
"कर ना यार सुरुवात बाद का बाद में देखेंगे. सूरू कर ब्लॅाग. जस्ट थिंक ही एकमेव गोष्ट अशी असेल ज्याच्या पायापासून घडणीपर्यंत सगळं तु केलेल असेल. काय माहीत काहीतरी अचंबा घडेल यातूनच. लिह तू बिंदास, कोणी नाही वाचलं तरी मी वाचेल आणि समजा मीही नाही वाचलं तर तु स्वतः आहेच कि. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान मी नाही अनुभवणार तर अजून कोण ?" माझे डोळे आणि माझ्या लेखणीतलं हे टची संभाषण होतं. मी शांतपणे ते ऐकत होते कारण मला त्यांच ते मेहनत घेणं मनापासून आवडत होत. यशस्वी होण्यात मजा आहेच, शंकाच नाही, परंतु यशस्वी झाल्यानंतर एकवार मागे डुंकून बघितलं कि वाटतं, यार ते स्ट्रगलींगचे दिवस यापेक्षा मुरलेले नि छान होते.
ए पण वरवर छान दिसतं एखाद पान बघायला पण ब्लॅीग बनवणं हे काय सोप्प काम नसत हां...जोशाजोशात सुरुवात तर केली मी. ते तर असं झालं, स्वत:च घर तर घेतलयं पण आता सगळ्या वस्तु योग्य ठिकाणी बसवणं सुरुवातीला एक्साइटींग होतं पण नंतर प्रोब्लेम्स येऊ लागले....ए पण घर सजत गेलं ना, तस तस आनंदाची कळी खुलत खुलत सगळं प्रभुल्लित करुन गेली हे मात्र खरं ....
या डोळे आणि लेखणीच्या संभाषणात मला माझी कॉफ़ी सापडली. जिथे स्वतःच्या अस्तित्वाचा गंध दरवळतो, कुणाच्या नसण्याने तिथे फरक पडत नाही, कुणाच्या फुटकळ आधाराची गरज लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे आनंद होतो स्वतःचे विचार एका स्वच्छ नितळ कागदावर शब्द म्हणून बुडवताना. लेखणी कशी वळते माहीत नाही परंतु पहिला नंबर आल्यानंतर जो आनंद नाही व्हायचा तो आनंद एक छोटी पण 'माझी कल्पना' कागदावर रंगवताना होतो. मग त्या प्रवाहाला दिशा नसते. काहीही आठवतं नि बेभान वादळासारखं मी लिहीत सुटते. कधी कधी या गडबडीत शब्दांचे प्रवाह हातातून निसटतात खरे! पण मला आनंद वेगळाच असतो, कारण मला शब्दांचं जाळ हवंय. पण भावना आणि शब्द यात मला निवड करायला लागली तर भावना पहिल्या पायरीवर ठेवते. आणि जिथे भावना अगणित आहेत, तिथे कधी कधी शब्द नसले तरी हरकत नसते, परंतु समोरच्यापर्यंत मी आणि माझी भावना तितक्या आग्रहाने पोहोचायला हवी, हेही महत्वाचं.
हे सगळं मनाला पटलं. माझी कळी खुलली,कुणासाठी नाही पण स्वतःसाठी लिहिल ठरलं... म्हणून हा प्रयत्न कम प्रयोग......
चियर्स फाॅर दॅट इंन्स्पिरेशनल स्ट्रगलींग काॅफी.....|


ऑन अ डेट विथ काॅफी.....

by on नोव्हेंबर ०४, २०१७
टेबलावर कसलाच केओस नव्हता. फक्त एक पेन, डायरी आणि काॅफी.... शेवटची ओळ टाइप करुन फिनिशिंग लाईनलाच होते, तितक्यात काॅफीच्या बुडबुड्यांनी मल...

अशाच एका संध्याकाळी वैतागून गच्चीवर जावं. मावळत्या सूर्याकडे बघून साऱ्या आयुष्याचा हिशोब मांडावा. 
घोंगावणाऱ्या माशीला दूर सारावं , एकवार पुन्हा त्या आग शांत झालेल्या सूर्याकडे पाहावं नि आयुष्याची भग्न चौकट द्यावी त्याच्या नावे करून.
एक सुस्कारा टाकावा, इतक्या दिवस नश्वर वाटणाऱ्या वार्याला कवेत घ्यावं,स्पर्श करावा, आकाशाकडे पाहावं नि पुन्हा एकदा सज्ज व्हावं रिकाम्या झालेल्या पटावर फासा टाकण्यासाठी.
या मावळत्या वीराकडे बघून एक मात्र शिकले,
जिंदगी इतनी भी खुदगर्ज नहीं जितना हम समझतें है। 
कभी कभी चलने के चक्कर में हम रुकना भूल जाते है , बिलकुल वैसेही जैसे खुशियां बटोर देते है ख़ुशी पाने के लिए ॥

आयुष्याचा हिशोब...

by on ऑक्टोबर ३०, २०१७
अशाच एका संध्याकाळी वैतागून गच्चीवर जावं. मावळत्या सूर्याकडे बघून साऱ्या आयुष्याचा हिशोब मांडावा.  घोंगावणाऱ्या माशीला दूर सारावं ,...